
मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत महाराष्ट्रात ठाकरे ब्रांडचे अस्तित्व दाखवून दिले आहे आणि राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. त्यामुळे नक्कीच मराठी आणि अमराठी असा मुद्दा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापण्याची शक्यता आहे. मात्र, याच मुद्द्यावरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांनी भाजपर निशाणा साधलाय. भाजपला राज्यात हिंदी-मराठीचं नरेटिव्ह सेट करायचाय असा आरोप सावंत यांनी केला. मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी झाली. तर, अमराठी माणसांची संख्या मागील काही दिवसात वाढलीय. त्यामुळे मराठी , अमराठी भाषेच्या मुद्द्यावरच पालिका निवडणुका लढवल्या जाणार असल्याची शक्यता आहे.
दोन्ही ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच महायुती अलर्ट झाली असून दोन्ही ठाकरेंना शह देण्यासाठी मिशन महापौर फॉर्म्युला सुरू केल्याची माहिती आहे. विविध समुदायाच्या लोकसंख्येनुसार पालिका निवडणुकांचा फार्म्युला ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. मराठीच्या मुद्द्यावरून एकीकडे 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. पालिका निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती देखील अलर्ट मोडवर आली. दोन्ही ठाकरेंना ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीकडून मिशन महापौरची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईतील विविध समुदायाची टक्केवारीनुसार महायुतीच्या निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार असल्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पालिका निवडणुकीत मराठी- अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यापासून महायुती उमेदवारांसाठी सर्व्हे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडे अमराठी मतांची जबाबदारी असल्याची माहिती आहे. दादांच्या राष्ट्रवादीकडे बहुजन मतांची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदेंच्या शिवसेनेकडे मराठी मतं वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा होता. दरम्यान शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता भाजपला उलथवून लावायची आहे. त्यामुळे महायुतीकडून मुंबई पालिकेसाठी मिशन महापौर राबवण्यात येणार आहे.