महाराष्ट्र

छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद विकोपाला.

खैरे आणि दानवे वाद चिघळला.

छत्रपती संभाजीनगरमधला खैरे आणि दानवे वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे यांनी दांडी मारली.
तर अंबादास दानवे यांच्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला जाणं टाळलं असल्याची चर्चा आहे. तर अंबादास दानवे यांच्याकडून आमंत्रण मिळालं नसल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले. इतकंच नाहीतर अंबादास दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हणताना अंबादास दानवे यांच्यावर चंद्रकांत खैरे भडकल्याचे पाहायला मिळाले. यावर चंद्रकांत खैरे यांनी दांडी का मारली हे त्यांनाच विचारा असंही अंबादास दानवे म्हणाले.
“मला अंबादास दानवे यांनी काहीही सांगितलेले नाही. मी स्पष्टपणे सांगतो. मी हे उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. तो अंबादास हा स्वत:ला मोठा समजतो. तुम्ही आम्हाला कचरा समजत आहात का? अंबादास दानवे हे नंतर आलेले आहेत. नंतर येऊन ते काड्या करण्याचे काम करत आहेत.” अशी सडकून टीका चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली.

Show More
Back to top button
error: Content is protected !!