

दिवा प्रभाग समितीत झालेल्या अनधिकृत इमारती बांधकाम प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे..
पण घोडबंदर रोड येथील पाणखंडा, मनी मंगल इस्टेट या भागात उभ्या राहिलेल्या शेकडो अनधिकृत चाळी , घोडबंदर रोड वर उभे राहिलेले अनधिकृत गाळे, इमारती, महागीरी, कोलशेत, नौपाडा, सावरकर नगर , वर्तक नगर , राबोडी, कळवा, विटावा , मुंब्रा, येऊर या सर्व भागात गगनचुंबी अनधिकृत इमारती उभ्या आहेत त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे ?? आणि त्या अनधिकृत इमारती, गाळे, चाळी का जमीनदोस्त केले जात नाही?? यामध्ये किती कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे?? असे सर्व प्रश्न सध्या ठाणेकरांच्या मनात आहेत.. या सर्व भागातील अधिकाऱ्यांवर कारवाई कधी???