
महाविकास आघाडी स्थापन करुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणं हा भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशी टीका आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच २०२२ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं तेव्हाही मी बदला घेतला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा ऑफर देते आहे असा दावा केला. या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.