दि 21/02/2025 घडलेला हा प्रसंग अवैध वाळू चे आणखी पाच निष्पाप बळी. प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार? भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघातील पासोडी गावच्या शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून 5 जणांना मृत्यू झाला आहे. दि. 22 फेब्रुवारी, शनिवारी पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली. अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजी पणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात हा प्रकार तिने आरडाओरडा केला असता टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक 12 वर्षीय मुलगी मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय -50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय -40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, वय -20 रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना, सुपडू आहेर, (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकिय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी
Unidentified Burnt Body Found on Highway Identified as ASI Golapi
19 hours ago
बाणगंगा चौराहा, भोपाल में स्कूल बस के अनियंत्रित होकर रेड सिग्नल पर खडे वाहनों को टक्कर मारने की दुखद घटना घटित होने के उपरांत पुलिस मुख्यालय भोपाल द्वारा सम्पूर्ण मध्य प्रदेश में लोक परिवहन एवं शैक्षणिक वाहनों, स्कूल /कालेजों के द्वारा प्रयोग में लाये जा रहे वाहनों के रखरखाव की जांच एवं दस्तावेज चैकिंग हेतु दिनांक 13.05.2025 से दिनांक 31.05.2025 तक विशेष अभियान चलाया गया । जिसे पुलिस अधीक्षक डिण्डौरी श्रीमति वाहनी सिंह द्वारा गंभीरता से लेते हुये सम्पूर्ण जिले में लोक परिवहन एवं शैक्षणिक वाहनों के रखरखाव एवं दस्तावेज चैकिंग के लिये निर्देशित किया गया ।
19 hours ago
मोटर सायकल चोरो को किया गिरफ्तार
19 hours ago
हरदासपुर के युवाओं ने किया 300वीं जयंती पर मातेश्वरी अहिल्याबाई होलकर का पूजन
19 hours ago
जनपद मऊ के सदर विधायक की सदस्यता रद्द
19 hours ago
हरदासपुर के युवाओं ने किया 300वीं जयंती पर मातेश्वरी अहिल्या बाई होलकर का पूजन
19 hours ago
पीड़ित पत्रकार से मिला सपा प्रतिनिधि मंडल, न्याय दिलाने का दिया आश्वाशन
19 hours ago
पॉलिटेक्निक कॉलेज में विश्व तंबाकू निषेध दिवस पर आयोजित हुआ कार्यक्रम
19 hours ago
*भोपाल में हुए प्रशिक्षण शिविर में खंडवा की मातृशक्ति ने भाग लिया*
20 hours ago
नवकार नगर जैन मंदिर में मुनि संघ के सानिध्य मे ऋत पंचमी का पर्व धार्मिक उत्साह के साथ मनाया गया,