दि 21/02/2025 घडलेला हा प्रसंग अवैध वाळू चे आणखी पाच निष्पाप बळी. प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार? भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघातील पासोडी गावच्या शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून 5 जणांना मृत्यू झाला आहे. दि. 22 फेब्रुवारी, शनिवारी पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली. अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजी पणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात हा प्रकार तिने आरडाओरडा केला असता टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक 12 वर्षीय मुलगी मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय -50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय -40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, वय -20 रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना, सुपडू आहेर, (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकिय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी
मीनाक्षी नटराजन का नामांकन निरस्त होना लोकतंत्र पर प्रहार: विभा पटेल
9 hours ago
*सदभावना मंच का आयोजन*
9 hours ago
*जन कल्याण शिविर के तीसरे दिवस 98 प्रतिशत आवेदनों का हुआ सफल निराकरण, यूसीसी हेल्प डेस्क पर नागरिकों ने दिए सुझाव*
9 hours ago
विधायक कंचन तनवे ने ग्रामीण क्षेत्रों में पानी की समस्या दूर करने के लिए पंचायत को टैंकर प्रदान किये।
9 hours ago
समाज की नई कार्यकारिणी का गठन, रविन्द्र शेंडगे बने अध्यक्ष।
9 hours ago
खंडवा की स्वप्निल जैन और रुचि पाटिल ने भोपाल में 13 दिवसीय प्रशिक्षण में लिया हिस्सा।
9 hours ago
रक्तदान जीवनदान जेसीआई खंडवा का सराहनीय अभियान।
9 hours ago
पार्टी कार्यालय में पूर्व जिला अध्यक्षो एवं वरिष्ठ जनों का हुआ स्वागत अभिनंदन।
13 hours ago
रेडक्रॉस सोसायटी जिला खंडवा द्वारा दादाजी स्वच्छता ग्रुप का सम्मान
15 hours ago
आगामी मोहर्रम पर्व को ध्यान मे रखते हुए थाना पदमनगर, कोतवाली एवं मोघट रोड थाना प्रभारी द्वारा अपने-अपने क्षेत्र की ताजिया समिति के सदस्य के बीच बैठक आयोजित कर ताजिया,आलम, सवारी भ्रमण रूट निरीक्षण कर दिये आवश्यक दिशा निर्देश।