दि 21/02/2025 घडलेला हा प्रसंग अवैध वाळू चे आणखी पाच निष्पाप बळी. प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार? भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघातील पासोडी गावच्या शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून 5 जणांना मृत्यू झाला आहे. दि. 22 फेब्रुवारी, शनिवारी पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली. अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजी पणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात हा प्रकार तिने आरडाओरडा केला असता टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक 12 वर्षीय मुलगी मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय -50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय -40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, वय -20 रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना, सुपडू आहेर, (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकिय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी
कथा की प्रचार समिति द्वारा कथा कवरेज के न्यूज़ पेपर दीदी कृष्ण प्रिया जी को सौंपे।
12 hours ago
सामाजिक दायित्वों का निर्वहन करते हुए जीतो जाॅब इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन द्वारा बेरोजगार युवाओं का हुआ पंजीयन।
12 hours ago
निमाड़ एवं मालवा में आकाशवाणी इंदौर का स्थापना दिवस मनाया।
20 hours ago
मंत्री डॉ. विजय शाह ने मामाडोह की अग्नि दुर्घटना प्रभावित परिवारों से मिलकर उन्हें हर संभव मदद के लिए आश्वस्त किया
20 hours ago
मामाडोह की अग्नि दुर्घटना प्रभावित परिवारों के लिए राशन, बिस्तर कपड़े और भोजन की व्यवस्था की गई
1 day ago
भरोसा रखिए, भय नहीं — नानी बाई रो मायरो कथा में उमड़ा आस्था और भक्ति का सैलाब।
1 day ago
*स्वामी बोदाराम साहेब उदासी जयंती महोत्सव पर निकली शोभायात्रा, आज होगा भंडारा*
1 day ago
*महापौर श्रीमती अमृता अमर यादव ने शहर विकास एवं व्यवस्थाओं को लेकर अधिकारियों को दिए महत्वपूर्ण निर्देश*
1 day ago
*सदभावना मंच ने संचार क्रांति के जनक राजीव गांधी को दी श्रध्दांजलि*
1 day ago
खंडवा विधायक कंचन मुकेश तनवे ने अपनी विधानसभा क्षेत्र के कार्यकर्ताओं से वन टू वन चर्चा कर क्षेत्र की विभिन्न गतिविधियों एवं जनसमस्याओं पर विस्तारपूर्वक संवाद किया गया